रोज सकाळी उपाशीपोटी फक्त तीन दिवस या पद्धतीने हे पान खाल्ल्याने शरीराला जे फायदे झाले त्याला फक्त चमत्कार म्हणावे लागेल हे 148 आजार मुळापासून गायब ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक वनस्पतीं आपल्या आरोग्याला खूपच फायदेशीर ठरतात. पण त्यांचा वापर कसा करायचा याची माहिती नसल्याने आपण भरपूर पैसे दवाखान्यात खर्च करीत असतो. मित्रांनो, रोज सकाळी उपाशीपोटी या पद्धतीने पान खा आयुष्यभर पुरेल इतके कॅल्शिअम मिळेल. मित्रांनो रोज सकाळी उपाशीपोटी नागवेलीचे पान किंवा खाण्याचे पान जर खाल्ले तर शरीराला असे फायदे होतात की ते एका चमत्कारापेक्षा मोठे आहेत. कारण याच्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे 148 रोग बरे होतात. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की पान सेवन करणे वाईट असते. खरे तर ते पान वाईट नसते. परंतु त्यामध्ये जो मसाला किंवा इतर घटक वगैरे टाकतात त्यामुळे तो वाईट असतो. तो आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असतो.

त्यामधील केमिकल घटक आणि काहीजण तंबाखू टाकून खातात ते वाईट आहे. परंतू फक्त पान हे शरीराला उपयुक्त आहे. आपल्याला सर्वात जास्त रोग हे हार्मोनल इमबॅलन्समुळे होतात. हार्मोनल बॅलन्स नीट राहत नसेल तर तुम्हाला वात, कफ, पित्त हे तीन दोष व यामुळे उद्भवणारे आजार होत असतात. म्हणून एक साधे खाऊचे पान आणायचे आहे. मित्रांनो यामध्ये कलकत्ता किंवा मद्रास असे काहीही न टाकता अगदी साधे खायचे पान किंवा नागवेलीचे पान आणायचे आहे.

या पानावर एक चमचा मध टाकून सकाळी उठल्याबरोबर खायचे आहे. सकाळी उठल्यावर तोंड धुऊन खायचे आहे. परंतू उपाशी पोटी खावे. यानंतर अर्धा तास काहीही खायचे नाही किंवा चहा सुद्धा प्यायचा नाही. हे पान चावून चावून त्याचा रस गीळायचा आहे. यामध्ये दुसरा कोणताही पदार्थ घालायचा नाही. हे खाल्ल्याने हार्मोनलचा बॅलेन्स होतो. असे केल्याने चेहऱ्यावर तेज येते, रक्ताभिसरण नीट होते, रक्त शुध्दीकरण चांगल्या रीतीने होते. यामुळे एलर्जीचे आजार निघून जातात व चेहऱ्यावर तेज येते.

ज्यांना पचनसंस्थे संबंधित आजार आहेत, अन्न व्यवस्थित पचत नसेल, छातीमध्ये जळजळ होत असेल, पोटामध्ये गॅसेस होत असतील तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी फक्त पान काही न टाकता खायचे आहे. हे पान चावून चावून त्याचा रस गीळायचा आहे.

त्यानंतर देखील अर्धा तास काही खायचे नाही. चहा किंवा पाणी सुद्धा प्यायचे नाही. हे जर तुम्ही तीन दिवस केले तर तुम्हाला फरक जाणवू लागेल. असे केल्याने पचनक्रिया व्यवस्थित होईल व छातीमधील जळजळ थांबेल.

यासोबतच करपे ढेकर, गॅसेस, अपचन यासारख्या समस्या निघून जातात. जर तुम्हाला कंबर व मानदुखीचा त्रास असेल किंवा पाठदुखीचा त्रास असेल , गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा कोणताही त्रास असेल तर सकाळी खाऊचे एक पान घ्यायचे आहे. त्यामध्ये तांदळाच्या दाण्या इतका खायचा चुना टाकायचा आहे आणि सलग तीन दिवस या पद्धतीने पान खायचे आहे.

जर अशाप्रकारे पान खाल्ले तर सांध्यावर आलेली सूज निघून जाते. शरीरामध्ये मोठ्याप्रमाणावर कॅल्शियम निर्माण व्हायला लागते. आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे आजार पूर्णपणे कमी होतात. ज्यांना सतत खोकला होतो, थंडीच्या दिवसांमध्ये कफ जास्त प्रमाणावर जाणवतो यासाठी या पानाचा वापर करावा. या पानांवर एक चमचा ओवा टाकायचा आहे आणि हे पान हळूहळ चावून खायचे आहे. कारण याचा रस गिळून घ्यायचा आहे.

हा उपाय पाच वर्षांपासून मोठ्या मुलांसाठी सुद्धा करता येतो. पण ओव्याचे प्रमाण थोडसे कमी वापरावे लागते. असे केल्याने शरीरामधील कफ पूर्णपणे जळून जातो आणि जो खोकल्याचा त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो.

अनेक औषधांनी बरा न होणारा हा खोकला या साध्या उपायाने बरा होतो आणि अशाप्रकारे पान आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त आहे. परंतु याचा वापर असा योग्य प्रकारे झाला पाहिजे. हार्मोन बॅलन्ससाठी या पानाचा उपयोग करा. तसेच पित्त विकार, कफ, वात या प्रकारचे त्रास असतील तर मध आणि पान या पद्धतीने सेवन करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *