मोजून फक्त सात दिवस करा हा घरगुती उपाय; पोटाची मांड्याची चरबी बर्फा सारखी वितळून जाईल इतके बारीक व्हाल की, सर्वजण बघतच राहतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल आपणाला आपल्या आसपास असणाऱ्या बऱ्याच लोकांचे वजन हे वाढलेले पाहायला मिळते आणि वजन वाढल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार देखील होण्यास सुरुवात होतात. म्हणजेच बीपी, शुगर तसेच किडनीचे त्रास, कोलेस्ट्रॉल यांचे अनेक प्रकारचे त्रास या वजन वाढीमुळे होत असतात. शरीरावरती अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे आपणाला थोडेसे चालणे देखील नकोसे वाटते. मग वजन कमी करण्यासाठी बरेच जण हे अनेक प्रकारची औषधे घेत असतात. डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतात. डायट करतात. तर कोणी जिम, व्यायाम हे दैनंदिन जीवनामध्ये करतच असतात.

परंतु काही केल्याने काही जणांचे वजन कमी होत नाही आणि मग आपणाला चारचौघात जाणेदेखील खूपच लाजल्यासारखे वाटते. तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे या घरगुती उपायामुळे तुमचे वजन हे नक्कीच कमी होणार आहे. तुम्हाला देखील आश्चर्य होईल की आपले वजन इतके कसे काय कमी झाले.

तर या उपायासाठी आपल्याला घरात असणाऱ्या पदार्थांचा वापर करायचा आहे आणि हा कमी खर्चिक म्हणजेच आपण दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला भरपूर पैसे मोजावे लागतात. परंतु हा घरगुती उपाय केल्यामुळे आपणाला खूप कमी खर्चामध्ये आपले वजन हे कमी होऊ शकते. तर वजन कमी करण्याचा हा घरगुती उपाय आपण आता पाहूयात.

तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लिंबू आवश्यक आहे. लिंबू हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. आपल्या पचनासाठी देखील लिंबू खूपच गुणकारी आहे .अनेक आयुर्वेदिक फायदे आपणाला होत असतात. तर लिंबू हे आपणाला एक घ्यायचे आहे आणि त्याचे काप करायचे आहेत. म्हणजे गोलाकार आकारामध्ये असे आपल्याला एका लिंबूचे गोलाकार काप करायचे आहेत.

नंतर आपणाला या उपायासाठी लसूण तीन ते चार पाकळ्या घ्यायच्या आहेत. म्हणजेच लसनाच्या तीन ते चार पाकळ्या घेऊन त्या सोलायच्या आहेत आणि नंतर त्या पाकळ्या एकदम कुटून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला थोडेसे आले देखील घ्यायचे आहे.नंतर आपल्याला हे आले थोडेसे उकळीच्या साह्याने ठेसून घ्यायचे आहे. नंतर एक ग्लास पाणी घेऊन हे पाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये उकळवायला ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण लिंबूचे गोलाकार काप केलेले आहेत हे काप आपणाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत.

नंतर त्यामध्ये लसणाच्या तीन-चार पाकळ्या ज्या आपण कुटून घेतलेले आहेत यादेखील त्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि थोडेसे आलेच आपण कुटून घेतलेले आहे ते देखील या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि नंतर हे पाणी आपल्याला उकळवायचे आहे. साधारणतः पाच ते सहा मिनिटे हे पाणी आपल्याला उकळवायचे आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे.

हे पाणी थोडेफार कोमट झाल्यानंतर हे आपल्याला प्यायचे आहे. मित्रांनो हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचे वजन हे नक्कीच कमी होणार आहे आणि तुमची चरबी देखील वितळणार आहे आणि तुमचे जे काही आजार असतील म्हणजेच वजन वाढल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे आजार असतील हे देखील तुमचे कमी होणार आहेत. तर असा हा कमी खर्चात घरगुती उपाय तुम्ही देखील आवश्य करून पहा आणि तुम्हाला देखील याचा शंभर टक्के रिझल्ट येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *