शिवलिंगाचे दर्शन घेताना ही एक चूक अजिबात करू नका नाहीतर भोगावे लागतील गं’भी’र परिणाम संपूर्ण घर होईल बरबाद ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की देवांचे देव हे महादेव आहेत आणि हे महादेव हे सर्व जगाचे निर्माते आहेत. महादेव आपल्या भक्तांमध्ये कधी भेदभाव करत नाहीत. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की, राक्षसाचा राजा लंकापती रावण हा त्यांचा सर्वात मोठा भक्त होता. मित्रांनो जसे महादेव भोले म्हणून ओळखले जातात, त्यापेक्षा जास्त त्यांचा राग हा मोठा आहे म्हणून आपण रोज त्यांचे दर्शन घेत असताना काही चुका केल्या तर त्या आपल्याला भोगाव्या लागतात. भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना होय. या महिन्यात भोलेनाथ खुप लवकर प्रसन्न होतात.

आणि म्हणूनच मित्रांनो या श्रावण महिन्यात केलेली शिवाची पुजा अधिक प्रमाणात फलप्राप्ती देते. मित्रांनो या महिन्यात केलेली महाकाल पूजा जास्त लाभ देते कारण या महिन्यातील पूजा इतर महिन्या पेक्षा जास्त प्रमाणात पवित्र मानली जाते.पण मित्रांनो शिवलिंगाची ही पुजा करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे कारण दयाळू शिव शंकर जसे आपल्यावर खुप लवकर प्रसन्न होतात, आपल्या प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात त्याचप्रमाणे या चुकीची शिक्षा देण्यास महादेव कोणतीही गय करत नाहीत. परिणामी महादेव क्रोधीत होऊ शकतात. मित्रांनो महादेवाचे दर्शन घेताना काही चुका न करणे आवश्यक असते. जर एखादा पुरुष, विवाहित असो वा अविवाहित असो शिवलिंगाला हात लावुन पुजा किंवा प्रार्थना केली तरी चालते.

मित्रांनो असं केल्याने त्याचे विवाहित जीवन चांगल्या प्रकारे चालू लागते. कारण शिवलिंगामध्ये एक तेजस्वी ऊर्जा असते ज्यामुळे त्या पतीपत्नी मध्ये प्रेम वाढते. त्यांना संतती गुणवान होते. मात्र तेच अविवाहित मुलींनी याची काळजी घ्यावी कारण अविवाहित मुलींनी शिवलींगाचे दर्शन घेताना त्याला स्पर्श करू नये.धर्मशास्त्रानुसार आपण शिवलिंगाला स्पर्श करतो आणि त्याची पुजा करतो कारण त्याने आपल्या जीवनात आनंद आणि सुख सुविधांबरोबर संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. अविवाहित मुलींनी अशी प्रार्थना करणे चुकीचे आहे. अविवाहित मुली 16 सोमवार उपवास करू शकतात. तसेच त्या शिवलिंगाची पूजा करू शकतात तसेच त्याना ऊचित वर मिळावे म्हणून प्रार्थना करू शकतात.

पण जर त्यांनी शिवलिंगास स्पर्श केला तर त्यांच्या जीवनात उलथा पालथ होऊ शकते त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही एक काळजी अविवाहित मुलींनी घेतलीच पाहिजे. मित्रांनो अशा रितीने जर भगवान शिव शंकराची मनोभावे स्पर्श न करता पूजा केली तरी ती मान्य व फलित होते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असेही सांगितलेलं आहे की भगवान शंकरांच्या शिवलिंगाला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, कारण ज्यावेळी आपण महादेवांना पूर्ण प्रदक्षिणा घालतो त्यावेळी त्यांच्याबरोबरच आपण त्यांच्या पितृगण आणि रुद्रगण यांनाही प्रदक्षिणा घालत असतो, आणि आपले शास्त्रानुसार रुद्रगण आणि पितृगण यांना प्रदक्षिणा घातली जाऊ नये यासाठी भगवान शंकरांना प्रदक्षिणा घालताना ती अर्धीच घातली जाते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो शिवपुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की महादेवांच्या मंदिरा जवळच आपले घर कधीही असू नये मित्रांनो जर आपले घर महादेवांच्या मंदिराच्या आजूबाजूला असेल किंवा जवळ असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार वादविवाद होणे पैशाची कमतरता होणे यासारख्या समस्या वारंवार उद्भवू लागतात आणि त्याचबरोबर मित्रांनो शिवपुराण मध्ये असे सांगितले आहे की महादेवांच्या मंदिराच्या शंभर फूट आवारामध्ये जी घरी असतील तर त्या सर्व घरांमध्ये मंदिराच्या ध्वजामुळे अनेक समस्या येऊ शकतात म्हणूनच कधीही महादेवांच्या मंदिराच्या जवळच आपले घर असू नये.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेकांना असाही प्रश्न पडलेला असतो की भगवान शंकरांची म्हणजे महादेवांची पूजा करताना त्यांना तुळशीची पाने वाहिली तर चालते का?
तर मित्रांनो याचे उत्तर खूप सोपे आहे की आपल्या सर्वांना माहीतच आहे की तुळशीची पाने ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असतात. आणि म्हणूनच तुळशीची पाने हे भगवान विष्णूंना आणि त्यांच्या अवतारांना वाहिली जातात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *