हे दोन आजार असणाऱ्या लोकांनी अजिबात खाऊ नये पालक, आणि मेथी, नाहीतर भोगावे लागतील गं’भी’र परिणाम ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या आहारात विविध भाज्या असतात. आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने आहार खूपच महत्वाचा भाग आहे. अनेक भाज्या आरोग्याचा दृष्टीने फायदेशीर तर काही हानिकारक देखील होऊ शकता आज आपण मेथी आणि पालक या भाज्यांविषयी माहिती घेणार आहोत. या ज्या दोन भाज्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. आपल्या शरीराला अनेक प्रकारचे लाभ मिळवून देतात. मात्र तरीसुद्धा काही व्यक्तींनी या भाज्या चुकूनही खाऊ नयेत. कारण या भाज्या खाल्ल्याने तोटे होऊ शकतात.

मित्रांनो मेथी आणि पालक खाल्ल्याने सर्वात मोठा फायदा होतो तो म्हणजे ज्या लोकांना रक्ताची कमी आहे त्यांना. रक्त कमी असेल तर इंग्रजीमध्ये ॲनिमिया असं म्हणतात तर मराठी मध्ये रक्त अल्पदा म्हणजे रक्ताची कमतरता म्हणतात. कारण रक्त कमी असेल तर वारंवार थकवा येतो, चक्कर मारते, कमजोरी जाणवते. शरीरातलं रक्त कमी झालेलं असतं अशा लोकांनी मेथी आणि पालक अवश्य खायला हवी. पावसाळ्यात या भाज्या उपलब्ध असतात अशावेळी आठवड्यातून एक ते दोन वेळा किंवा तीन-तीन वेळा न चुकता ह्या भाज्या खायला हव्यात. त्यामुळे तुमच्या शरीरातलं रक्त आपोआप वाढीस लागेल. मोसमात मिळणाऱ्या या भाज्या तीन-चार महिने खाल्ल्यास तुम्हाला वर्षभर रक्त वाढीच्या गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही. आयर्न, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही. भाजी आवडत नाही त्यांनी सूप करून खाऊ शकतात तसेच ज्यूस काढून पिऊ शकतात.

मित्रांनो दुसरा मोठा फायदा आहे गोष्ट महत्त्वाची या भाज्या स्त्रिया-पुरुष तसेच लहान मुलांनाही चालतात. वृद्धांसाठी चालतात. सर्व वयोगटातील व्यक्तींना मेथी आणि पालक ची भाजी चालते.

मित्रांनो पोट साफ होत नाही अशा लोकांनी या भाज्या खाण फायदेशीर ठरेल. डोळ्यांची नजर कमी झाली असेल, डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नसेल तर पालक आणि मेथी या दोन्ही भाज्या डोळ्यांची नजर सुधारण्यासाठी, डोळ्यांचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी मेथी आणि पालकचा ज्यूस प्यायलात तर खूप फायदेशीर ठरेल. सोबत गाजर पपई, दूध याच सुद्धा सेवन केले पाहिजे.

मित्रांनो काही जणांना सकाळी चक्कर मारते, उठल्यानंतर लगेच भोवळ येते, चक्कर मारण्यासारखं होतं त्या लोकांनी सुद्धा या मेथी आणि पालकची भाजी नियमित खाल्ली तर या सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो ज्यांना रक्त दूषित होण्याचा प्रॉब्लेम वारंवार होत असेल तर शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटक बाहेर पडणे आवश्यक असते. पोट साफ होण्यासाठी या भाज्या खाण आवश्यक आहे.

मित्रांनो ज्यांना लोकांना मधुमेह आहे रक्तामधील शुगर वाढली असेल तर अशा या लोकांनी सुद्धा मेथी आणि पालक खाल्ल तर फायदा होतो. जर तुम्हाला मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर मित्रांनो या दोन भाज्या खाल्ल्याने आपल्याला मधुमेह भविष्यात कधीही होणार नाही. आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम ही मेथी आणि पालक करते.

इतके सारे गुणधर्म आहेत तर या भाज्या काही लोकांनी खाऊ नयेत असं होईल का? कोणी खाऊ नयेत तर मित्रांनो ज्या लोकांना मुतखडा आहे मग तो किडनीमध्ये असेल किंवा ब्लॅडरमध्ये असेल अशा लोकांनी चुकूनही मेथी आणि पालक खाऊ नये. कारण या भाज्या खाल्ल्याने मुतखडा वाढू शकतो, तुमचा त्रास वाढवू शकतो म्हणून हे पथ्य लक्षात ठेवा की ज्यांना मुतखडा झालेला आहे त्या लोकांनी चुकूनही मेथी आणि पालक खायची नाही.

दुसरी गोष्ट ज्यांना वारंवार टॉयलेटला जावं लागत अशा लोकांनी सुद्धा मेथी आणि पालक खाऊ नये. कारण ज्या लोकांना टॉयलेटला साफ होत नाही अशा लोकांसाठी पालक आणि मेथी फार उपयोगी असते आणि म्हणून तुम्हाला जर पुन्हा पुन्हा टॉयलेटला जावं लागत असेल वारंवार जावं लागत असेल तर तुम्ही मेथी आणि पालक खाऊ नका. यामुळे तुमचा त्रास अजून जास्त वाढू शकतो.

तसेच ज्यांना जुलाब लागलेली आहेत अशा लोकांनी सुद्धा मेथी आणि पालक कटाक्षाने टाळा कारण ज्यांना जुलाब लागले असतील त्यांच्या मोठ आतड वाढलेलं असत अशा वेळेस जर आपण मेथी आणि पालकची भाजी खाल्ली किंवा त्याचा ज्यूस घेतला तर त्यामुळे अशा लोकांना अजूनच जास्त जुलाब लागतात किंवा मोठे आतड अजूनच जास्त वाढू शकतं म्हणून अशा लोकांनी मेथीचे आणि पालकच सेवन करू नये.

मित्रांनो फक्त अशा दोन आजारात लोकांना मेथी आणि पालक खाण चालणार नाही.

मित्रांनो बाजारामध्ये ज्या मेथी आणि पालकच्या भाज्या मिळतात त्या शक्यतो शेतकरी वर्गाकडून विकत घ्या. कारण हे लोक अतिशय चांगल्या प्रकारे या भाज्या वाढवतात. काही ठिकाणी या भाज्यांवरती अतिरिक्त कीटकनाशक वापरले जातात. रासायनिक खतांचा जास्त वापर केला जातो आणि त्यामुळे ही कीटकनाशक ही जी काही जंतू आपल्या पोटामध्ये जातात. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराच्या पाठीमागे परसबागेत किंवा गच्ची, टेरेस अशा ठिकाणी मेथी आणि पालक उगवू शकता. मेथी आणि पालकच बियाणं बाजारात मिळतं ते विकत घ्या. मातीमध्ये टाका जास्त पाणी शिंपडा अगदी सहज ह्या भाज्या उगवतात आणि तेही सेंद्रिय पद्धतीने तुम्हाला या भाज्या उपलब्ध होतील. ज्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतील.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *